Posts

Showing posts from April, 2020
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आदर्श पत्रकार दादासाहेब काळे यांच्या मुळे पुणे येथे अडकलेली औरंगाबाद येथील एक चिमुकली सुखरूप घरी पोहचली.

Image
आदर्श पत्रकार दादासाहेब काळे यांच्या मुळे पुणे येथे अडकलेली  औरंगाबाद येथील एक चिमुकली सुखरूप घरी पोहचली. .. प्रतिनिधी  Dr अमोल जाधव वडोद बाजार येतील त्या लहान मुलीचे आई-वडील औरंगाबाद मध्ये गावाकडे  आले. परंतु   पुण्याला जाताना लोकडाऊन   झाला . त्यामुळे तिचे आईवडिल पुण्यात जाऊ शकले नाहीत. ती लहान मुलगी  पुण्यामध्ये अडकून पडली. तिला घरमालकांनी तिचा सांभाळ केला. परंतु एक दीड महिन्याचा कालावधी मध्ये लहान असल्याने तीच मन लागत नव्हतं. चिमुकली  ची मानसिक प्रकृती खालावत  चाली होती. अशा तच त्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांनी पत्रकार दादासाहेब काळे यांना ही माहिती सांगितली,  दादासाहेब काळे यांनी ही माहिती औरंगाबाद पोलीस अधीक्षकांना कळवली  औरंगाबाद पोलीस अधीक्षकांना कळवल्यानंतर ही माहिती पुण्याच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले परंतु पुण्यातील प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करायला तयार होईना.  त्यामुळे  दादासाहेब काळे यांनी राजकीय  चक्र फिरवले. तेव्हा  शासकीय यंत्रणेने कार्य केले. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी ...

पेराल ते उगवेल

Image
" *पेराल ते उगवेल * " *डॅा.दत्ता कोहिनकर* (व्याख्याते) 🎤 लेखक-(मनाची मशागात)© Mob.9822632630 एका माणसाने खूपच भावनाविवश होऊन रडत रडत वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना मुक्ती मिळण्यासाठी भगवान बुद्धांकडे आग्रह धरला. बुद्धांनी त्या माणसाला दोन मडकी आणून एका मडक्यात तूप व एका मडक्यात खडी भरावयास लावली. त्या दोन्ही मडक्यांना तलावात ठेवून काठीचा प्रहार करावयास लावले. मडकी फुटली - तुप तरंगले व खडी पाण्याखाली गेली. बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले आता तुला जे कर्मकांड करावयाचे ते कर. ज्यावेळेस ही खडी वर येईल व तूप खाली जाईल त्यावेळेस झटकन तुझे वडील मुक्त होतील. तो बुद्धांकडे पाहत गोंधळलेल्या स्वरात म्हणाला *भगवान पण ही खडी जाड वजनदार ती पाण्यावर कशी येणार? हे तूप हलके - फुलके हे खाली कसे जाणार*?. निसर्गनियमानुसार हे होऊच शकत नाही. त्यावेळेस हसत भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्या पित्याने या तुपासारखे हलके-फुलके सत्कर्म केले असेल तर ते वरच म्हणजे सतगतीला जाणार व या दगडांसारखे जड (त्रासदायक) काम केले असेल तर ते खालीच (अधोगतीलाच) जाणार. हाच निसर्गाचा नियम आहे. *मित्रानो नेहमी सतकर्म करा व ...

इरफान आपल्या ध्येयासाठी दिवसरात्र एक करत घेतला जगाचा अखेरचा निरोप

Image
**************************************** बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२०, साधारणतः दुपारची वेळ, सोशल मिडिया वर इरफान खान यांच्या दु:खद निधनाची बातमी झळकली आणि क्षणभर ह्रदयाचा ठोकाच चुकला. नक्कीच कुणीतरी खोडसाळपणा केला असेल वाटले परंतु वृत्तवाहिन्यांनी जेव्हा या घटनेची पुष्टी केली तेंव्हा चुकचुकल्यासारखे वाटले. निश्र्चितच इरफान खान ना कुणी नात्यागोत्यातला होता ना आपल्या गावचा. मात्र लाखो करोडो सिनेरसिकांना आपलासा वाटणारा हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला हे मानायला मन तयार होत नव्हते. खरेतर लॉकडाउन असतांना पहिले इरफानच्या मातोश्री आणि लगेचच इरफानला आपल्यातून हिरावून नेतांना नियतीने निष्ठूरतेचा कळस गाठला होता. मात्र शेवटी *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा* हेच खरे ठरले. जयपूर, राजस्थानला पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानचा जीवनप्रवास जितका रोमांचक आहे तितकाच त्याच्या जिद्दीचा परिचय देणारा आहे. लहानपणी वडीलांसोबत शिकार करतांना प्राण्यांचे जाणारे हकनाक बळी पाहतांना तो हळहळला आणि याचीच जाणीव त्याने जन्मभर राखली. अभ्यासात फारसे न रमणारी ही स्वारी मैदानात मात्र बहरून जायची. विशेषतः क्रिकेटवर त्...

सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज चा राळेगाव च्या तहसीलदाराला दणका 

Image
सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज चा राळेगाव च्या तहसीलदाराला दणका  !! प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700  सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज च्या भीतीने राळेगाव येथील मुधापुर गावातील तरुणाला विलगीकरणातून घरी जाण्याचा सल्ला दिला आहे. या संदर्भात रुग्णाला एक प्रशासकीय पथक पाठवून त्या रुग्णाला वैद्यकीय तपासणी त्याची करायला भाग सुपर फास्ट न्यूज ने भाग पाडलेलं आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ने तहसीलदाराने बळजबरीने चार महिन्यापासून गावात राहणाऱ्या व्यक्तीला विलगीकरण केलं होतं. या संदर्भातला बातमी प्रसारित केली होती.यानंतर सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी डॉक्टर अमोल जाधव, समर्थ होळकर यांच्या मार्फत तहसीलदारला विचारपूस केली होती. तहसीलदार हे वैद्यकीय अधिकार नसताना असं कस करू शकतात. त्यामुळे तहसीलदार घाबरून तहसीलदाराने त्या व्यक्तीला त्याच्या घरी जायला सांगितले आहे. त्या संबंधित व्यक्तीने सुपरफास्ट महाराराष्ट्र न्यूज टीमचे व सर्वांचे आभार मानले आहे व यामुळे त्या व्यक्तीला न्याय मिळालेला आहे. संदीप ने Dr अमोल जाधव व संपादक सविता संकपाळ आणि सुपर फास्ट न्यूज टीम चे फोन कर...

खासदारांनी खाजगी डॉक्टर ला संरक्षण किट दिली भेट...

Image
खासदारांनी खाजगी डॉक्टर ला संरक्षण किट दिली भेट...  लोहा प्रतिनिधी.. लोहा व कंधार चे भूमिपुत्र म्हणून ओळखले जानारे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते लोहा व.कंधार शहरातील खाजगी डॉक्टर यांना संरक्षण किट देण्यात आली .जगात करोना ने हा हा कर केले ला आसल्याने आपल्या लोहा व कंधार शहरातील खाजगी डॉक्टर यांच्या खाजगी दवाखान्यात पेशंट चा थोडा भार वाढला आहे.. यात येनारे पेशंट बाहेर गावातील आसता त या मुळे डॉक्टर चे संरक्षण गरजेचे असल्यामुळे आज खाजगी डॉक्टर ला संरक्षण किट खासदार साहेब यांच्या हस्ते देण्यात आली.. सुपर फास्ट प्रतिनिधी सिध्दार्थ ससाणे लोहा

.एकाच दिवसात 778रूग्ण सापडले महाराष्ट्रात --सर्वात जास्त पेशंट 23एप्रिल रोजी

Image
.एकाच दिवसात 778रूग्ण सापडले महाराष्ट्रात --सर्वात जास्त पेशंट 23एप्रिल रोजी सुपर फास्ट न्यूज प्रतिनिधी Dr अमोल जाधव 7218869700 राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात १४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६, पुणे येथील ५, नवी मुंबई येथे १, नंदूरबार येथे १ आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ८ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या १४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २ रुग्ण आह...

* *प्रताप महाविद्यालय देशात 58 तर राज्यात 16 वे मानांकन*

Image
*प्रताप महाविद्यालय देशात 58 तर राज्यात 16 वे मानांकन* जळगाव प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नामांकित व जळगाव जिल्यातील अग्रेसर खां. शि. म. चे प्रताप महाविद्यालय देशातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये भारतातील अग्रेसर महाविद्यालयांमध्ये नामांकन मिळाले आहे. सन 2020-2021 मधील देशातील 747 स्वायत्त महाविद्यालयांची यादी Education World Magazine ने मानांकनाची नुकतीच नप्रसिद्ध केली. या यादीत महाराष्ट्रातील नामांकित कॉलेज प्रताप महाविद्यालयला स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीत देशात 58 वे तर महाराष्ट्रतून 16 व्या क्रमांकाने मानांकित करण्यात आले महाविद्यालयाची एकूणच गुणवत्ता सुविधा पाहून UGC (Delhi) तर्फे स्वायत्ता दर्जा दिला जातो. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश मुंदडा, कार्यउपाध्यक्ष निरज अग्रवाल, संचालक जितेंद्र जैन, कल्याण पाटील, हरिभाऊ वाणी, डॉ संदेश गुजराथी, डॉ. बि. एस. पाटील, प्रदीप अग्रवाल, प्राचार्या डॉ. राणे मॅडम, सचिव प्रा. जैन तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला. प्रताप महाविद्यालय हे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर मह...

*पत्रकारांची व्यथा कोणी गांभीर्याने घेईल का

Image
*पत्रकारांची व्यथा कोणी गांभीर्याने घेईल का?*  *अनेकांना शासनाच्या वतीने मदतीचे आवाहन, मात्र पत्रकारांसाठी तरतूद का नाही?*  दी.15 - केंद्र व राज्य शासनाने पत्रकारांसाठी आर्थिक मदतीची तरतुद करावी कारण शासकीय कर्मचाऱ्यांना घरबसल्या पगार दिला जातो. व खासगी क्षेत्रातील अनेक कंपनी असतील फायनन्स असेल यासह अनेकांना पगार दिला जातो. मात्र प्रिंट मिडीयातील व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा देशाच्या जडणघडणी मध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे शासनाचा व जनतेचा मोठा दुवा म्हणुन काम करणारा पत्रकाराचा चौथा स्तंभ म्हणुन उल्लेख केला जातो. त्यामुळे यामध्ये काम करणारे माझे सर्व पत्रकार बांधव, दिवस रात्र उन नाही ताण नाही, कोणताही रोग नाही, कर्फ्यू नाही, अहोरात्र बिन पगारावर काम करून ,सर्वसामान्य जनते पर्यंत घर बसल्या सर्व बाबीचे बातमी पोहचवतो. आज या घड़ीला कोरोनो सारखी भयानक बिमारी आली असुनही, प्रिंट मिडीया असो की इलेक्ट्रॉनीक मीडीया सर्व पत्रकार बांधव बातमीसाठी वनवन भटकंती करून बातमी घेत आहेत.आणि सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचवण्याचे काम ते करतायत.आज ह्या घडीला एवढी बिमारी आली की पुर्ण देशात कह...

पिंपरीचिंचवड मध्ये आज दोन कोरोना पॉझिटीव्ह ....!

Image
पिंपरीचिंचवड मध्ये आज दोन कोरोना पॉझिटीव्ह ....!  पिंपरी : पिंपरीचिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज ( ता.२३ गुरुवार ) दिवसभरात निगडी रुपीनगर परिसरातील २६ वर्षाच्या तरुणाला व शहराबाहेरील आणखी एका तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दोघांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६९ वर पोहचली आहे. त्यापैकी २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज घरी सोडलेला रुग्ण भोसरी परिसरातील आहे आजपर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात ३७ तर शहरातील ९ रुग्णांवर न न पा हद्दीबाहेरलरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

लोहा पोलीस स्टेशनला खासदार दिली निर्जंतुकीकरण मशीन भेट........ 

Image
लोहा पोलीस स्टेशनला खासदार दिली निर्जंतुकीकरण मशीन भेट........   लोहा प्रतिनिधी ....................................कर्तव्य निष्ठ पोलिसांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते.. माक्स,सेनिटायजर ,व निर्जंतुकीकरण मशीन भेट आज देण्यात आली करोनामुळे जो जगभर अहंकार माजला आहे त्या मुळे आपल्या लोहा शहरात दिवस रात्र आपल्या परीवाराला सोडून जनतेची गैर सोय होऊ नये म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. जनतेचे सुरक्षा साठी रात्रन दिवस लोहा पोलीस स्टेशन चे पी आय जायभाये साहेब व त्यांचा स्टाॅप आहोरात्र मेहनत करत आहेत त्यांचे सुरक्ष ची काळजी करून आज त्यांना मास्क व सेनिटायझर चे वाटप सुध्दा खासदार साहेबांच्या हस्ते वाटप करण्यात आले त्या वेळेस सर्व पद अधिकारी ,नगराध्यक्ष.उप नगराध्यक्ष नगरसेवक. इतर कार्यकर्ते उपस्थित होते...... लोहा प्रतिनिधी सिध्दार्थ ससाणे.. लोहा.

कर्जत शहर भाजपाच्यावतीने मोफत नमो थाळी

Image
कर्जत शहर भाजपाच्यावतीने मोफत नमो थाळी  -शहराध्यक्ष वैभव शहा. प्रतिनिधी कर्जत. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल पाहून माणुसकीच्या भावनेतून भारतीय जनता पार्टी कर्जत शहर यांच्यावतीने गरजू व्यक्तींना जेवण व्यवस्था सुरू. या नमो थाळी भोजन व्यवस्थेचे उद्घाटन प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले असे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष वैभव शहा यांनी सांगितले. शासकीय व वैयक्तिक कामासाठी आलेल्या तालुक्यातील जनतेची लॉक डाऊन मुळे जेवणाची गैरसोय होते आहे .परिणामी अशा व्यक्तींना भोजना पासून वंचित राहावं लागत आहे. हे लक्षात घेऊन शहर अध्यक्ष वैभव शहा यांच्या संकल्पनेतून भाजपा कर्जत शहराच्या वतीने नमो भोजन चालू करण्यात आले आहे. सकाळी साडेअकरा ते दीड या कालावधीमध्ये मोफत भोजनाची व्यवस्था महाविर चौक बाजारतळ कर्जत येथे करण्यात आली आहे .दिनांक 22 एप्रिल ते 13 मे 2020 पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. नमो भोजनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत ,प्रसाद ढोकरीकर ,उमेश जेवरे , सुजय दादा विखे साहेबांच्या वतीने त्या...

भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या वतीने येवला शहरात अपंगांना भाजीपाला व किराणा वाटप करून दिला आधार

Image
भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या वतीने येवला शहरात अपंगांना भाजीपाला व किराणा वाटप करून दिला आधार  सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा .येवला प्रतिनिधी : - विजय खैरनार येवला, ता.२३: येतील येवला मुक्तीभूमी या ठिकाणी भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सच्या नियम व शिस्तीचे पालन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक सर्वसामान्यांचे रोजगार बुडाल्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न निमार्ण झालेले आहेत,हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असून ऐन उन्हाळ्या हंगामात प्रखर उन्हाचा कहर आणि अशातच सर्वसामान्यांसोबत दिव्यांगावरसुद्धा अक्षरशः उपासमारीची वेळ निमार्ण होण्याची परिस्थिती येऊन ठेपली आहे.हातावर पोट असणारे मोलमजुरी करणारे,छोटे गृहउद्योग करणारे घरेलू कामगार,मजूर बेरोगारीच्या सावटाने हातास झाले आहेत अशातच कुटुंबातील अंध,अपंग गरजूंना सांभाळणे जिकरीचे झाले असतांना परिस्थितीचे गांमभिर्य लक्षात घेऊन येवला शहरातील अशा गरजू दिव्यांगांना भाजीपाला व किराणा वाटप करून आधार दिल...

येवला तालुक्यातील ५२ गावे टॅँकरमुक्त ! 

Image
येवला तालुक्यातील ५२ गावे टॅँकरमुक्त !   सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी. नाशिक जिल्हा. अंकित मोहोड. मो .7774862821.. येवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत. तालुक्यातील धानोरे, धूळगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, एरंडगाव बु॥, एरंडगाव खु., जळगाव नेऊर, नेवरगाव, मानोरी, देशमाने, बाभूळगाव बु॥, बाभूळगाव खु., अंगणगाव, साताळी, निमगाव मढ, कुसूर, अनकुटे, धामोडे, सावरगाव, विसापूर, विखरणी, कातरणी, सोमठाण देश, अंदरसूल, गवंडगाव, उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल, नांदेसर, नगरसूल, सायगाव, भारम, न्याहारखेडा बु॥, न्याहारखेडा खु. पिंपळखुटे बु॥, पिंपळखुटे खु., सुरेगाव रस्ता, भायखेडा ्रआदी ३८ गावे टँकरमुक्त झाली आहेत. यात १४ गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर दरवर्षी होणारा लाखोंचा खर्च वाचवण्यासाठी नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. या योजनेतील समाविष्ट ३८ गाव टँकरमुक्त झाल्याने या गाव परिसरातील इ...

लॉक डाऊन वाढवल्या मुळे गोरगरीब लोकांची दैनीय अवस्था आसल्या मुळे त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सूर्या ग्रुप महाराष्ट्र तर्फे धान्यं व किराणा किट देवून एक हात मदतीचा

Image
लॉक डाऊन वाढवल्या मुळे गोरगरीब लोकांची दैनीय अवस्था आसल्या मुळे त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न सूर्या ग्रुप महाराष्ट्र तर्फे धान्यं व किराणा किट देवून एक हात मदतीचा  सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज.प्रतिनिधी अंकित मोहोड. मो.7774862821 -- सुर्या ग्रुप महाराष्ट्र ----- कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातले. तरीही राज्य सरकारने लॉक डाऊन वाढवल्याने गोर गरीब लोकांची दैनीय अवस्था असल्यामुळे त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न उद्दभवतो . मुळात सांगायचं म्हणजे सुर्या ग्रुप हा एक मदतीचा हात आहे ही राजकीय पक्ष अथवा संघटना नाही जय सुर्या. आज पहीला टप्पा अकोला येथे ज्या नागरीकांन कडे राशन कार्ड नाही व ज्यांना कोणताही शासकीय मदत मिळाली नाही अश्या गरजु लोकांना सुर्या ग्रुप अकोला जिल्हा महा,राज्य तर्फे धान्य व किराणा किट वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित गोपाल भाऊ नवलकार, गोपाल भाऊ तायडे, आकाश भाऊ लहाळे, अंकुश भाऊ नागे,मदन भाऊ तायडे, सागर भाऊ नवलकार, स्वप्निल भाऊ खरात, शुभम पाटील गावंडे, योगेश भाऊ भागवतकर, वैभव भाऊ सरोदे व सुर्या ग्रुप सदस्य उपस्थिति होते*

राळेगाव येथील तहसीलदाराने मुधापूर येथील युवकाला केले कारण नसताना Qurantine) (विलगीकरण ) *

Image
राळेगाव येथील तहसीलदाराने मुधापूर येथील युवकाला केले कारण नसताना Qurantine) (विलगीकरण )  *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी*  Dr अमोल जाधव 7218869700  सविस्तर मुधापूर येथील संदीप देऊळकर युवकाला चार महिन्यापासून तो गावातच राहत होता. परंतु तरीही तहसीलदारांनी विलगिकरण शाळेत केले आहेत. . तो युवक चार महिन्यापासून गावात आहे असं गावातील व्यक्तीनेही सांगितल आहेत. याविषयी तहसीलदारांशी संपर्क साधला असता तहसीलदारांनी सांगितलं की हा त्याच्या गावातील गावात असणाऱ्या मजुराच्या संपर्कात आला होता, अस तहिसलदार म्हणाले. परंतु गावातील कोणत्याही व्यक्तीने तो कोणाच्या संपर्कात आला असं सांगितलं नाही. तो चार महिन्यापासून गावांमध्ये उपलब्ध आहे असं गावकर्यांनी सांगितलं, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य अधिकारी आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की तहसीलदाराने उगाच त्याच्यावर द्वेषाच्या भावनेतून कारवाई याच्यावर केलेली आहे. सरपंचनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला... तें म्हणाले कि तहिसलदार यांनी अधि...

मी अन्नदाता उपक्रमास उत्कर्ष प्रतिसाद

Image
मी अन्नदाता उपक्रमास उत्कर्ष प्रतिसाद . लातूर प्रतिनिधी -लातूरचे महापौर यांनी कोरोनाच्या लाँकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी सुरु केलेल्या मी अन्नदाता उपक्रमात सहभाग नोंदवत श्नी.शिवराज जी.मोटेगावकर सर यांनी 20 कुंटुंबाची जबाबदारी उचलत 1लक्ष रू निधी मदत स्वरूपात दिला.तर श्नी.धिरजजी तिवारी यांनी 50 कुंटुंबाची जबाबदारी उचलत 25000 रू.मदत केली. श्नी सौरभ ताथोडे यांनी 150किलो तुरदाळ मदत केली. हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशन चे श्री जब्बारजी पठाण, श्री जियाउद्दिनजी खोरीवाले, श्री कलिमजी खोरिवाले, श्री मुजाहिदजी काजी, श्री आयुबजी पठाण श्री मेहफुझजी सय्यद, श्री आय्याज सय्यद यांनी 15 पोते तांदूळ स्वरूपात मदत उपलब्ध केली. लातूरकरांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार. आपणही गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा. संपर्क श्री महेश शर्मा 9890417117 महापौर सहायता समन्वय कक्ष. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.

21दिवसात तिन हजार कुटूंबांना मदत* ........

Image
*21दिवसात तिन हजार कुटूंबांना मदत* ........  *नामदेव भोसले,* *दौंड* दि,23/04 गेली काही दिवसांपासुन देश कोरोना मुळे लाॅकडाउन आहे अचानक सर्व काही व्यवहार थांबल्यामुळे देशातील व सर्व राज्यातील हातावर पोट रोटी साठी घराभाहेर पडणारे व रोज कांम केले तरच ज्याची चुल पेटत होती अशा गोर गरीब कुटुंबाची परिस्थिति या बंद मुळे आणी रोजंदारी थांबल्यामुळे गाव कुसाबाहेर जंगलात, वणात, डोंगराळ भागात, रहात असलेल्या गरीब आदिवासी लोकांची उपासमार होण्यास सुरुवात झाली , अशात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा .श्री संदिप पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन गरीब कुटुंबाना मदत करण्यासाठी घर सोडुन गेले काही दिवसांपापुन काम करत आहेत, प्रत्येक गावातील वाडी वस्तीवर जाऊन गरीब, शोषित, पिढीत, आदिवासी बंधूभगीनींना घर पोच एक महिना पुरेल एवढा बाजार घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले,अशात काही तालुक्यालील महसुल विभागाकडुन व पोलिस स्टेशनच्या माध्यमातुन लोकांपर्यत घरपोच धान्य व बाजार देण्यात येत आहे,पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री नवल क...

काळेवाडी नढेनगर मध्ये भाजी व्यापाऱ्यांचा रात्रीस नागरिकांच्या जीवाशी खेळ ..! प्रशासनाचे दुर्लक्ष ....

Image
काळेवाडी नढेनगर मध्ये भाजी व्यापाऱ्यांचा रात्रीस नागरिकांच्या जीवाशी खेळ ..! प्रशासनाचे दुर्लक्ष ....  ता.२३ पिंपरी : कोरोनाच्या या संकटामध्ये पिंपरीचिंचवड हे रेड झोन मध्ये गेले आहे यामुळे प्रशासनाने काठोर पावले उचलली आणि संपूर्ण पिंपरीचिंचवड शहर कॅटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले या गोष्टीची कल्पना नागरिकानाही दिली आहे ,भाजीपाला विक्रीची ठिकाणे आणि वेळही ठरवून दिली आहे ,तरी पिंपरीचिंचवड महानगरपालिका हद्दीतील काळेवाडी नढे नगर येथील स्वराज कॉलनी येथे काही आठ दहा व्यापारी मिळून दमदाटी, दादागिरी करत नागरिकांच्या जीवाशी खेळत, सोसिअल डिस्टन्स ला हरताळ फासत रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत भाजी मंडई भरवत आहेत नागरिकही भाजी घेण्यासाठी गर्दी करताना आढळून आले ,आजूबाजूच्या नागरिकांनाही नाहक त्रास होत आहे, या सर्व गोष्टीकडे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे ,पोलीस येऊन जुजबी कारवाई करून निघून जातात,असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे .या सर्व गोष्टींतुन नागरिकांच्या जीवास मोठा धोका झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत .

केंद्रीय पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या अनुमानानुसार मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42,000 आणि 15 मे पर्यंत 6.5 लाख लोक करोना बाधित होणार आहेत

Image
केंद्रीय पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या अनुमानानुसार मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42,000 आणि 15 मे पर्यंत 6.5 लाख लोक करोना बाधित होणार आहेत     त्यामागील कारणे अशी की... 1) करोना संक्रमित असल्याने सतत रस्त्यावर फिरणार्रामुळे परिसरात, इमारतीत तसेच घराघरात पोहचत आहे. 2) फिरून घरी आल्यावर कोणीही आंघोळ किंवा साबणाने हातपाय व चेहरा धूत नाहीत. 3) घराबाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे घरी आल्यावर लगेच धुवून काढत नाहीत. तेच कपडे व मास्क पुन्हा वापरले जातात. 4) वायरसची साखळी तोडण्यासाठी एकदा घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा 3-4 दिवस घराबाहेर पडायचे नसते. तरीही लहानसहान कामासाठी वारंवार घराबाहेर पडतात. 5) भाजीपाला, फळे घरी घेऊन आल्यावर तो काही वेळ गरम पाण्यात भिजवून नंतर सुकवायचा आहे. तसेच भाजीची पिशवी लगेच साबणाने धुणे आवश्यक आहे. पण यापैकी काही केले जात नाही. 6) किराणा माल तसेच रेडीमेड खाद्यपदार्थ घरी आणल्यावर 1-2 दिवस हाताळू नयेत. पण त्याचे भान कोणीही ठेवत नाही. 7) अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीस, बाजारात जाताना मास्कबरोबर हातात ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे, पण त्याकडे लक्ष देत नाहीत. 8) व...

नांदेड येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू ही अफवा- जिल्हाधिकारी डॉ बिपीन. 

Image
नांदेड येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू ही अफवा- जिल्हाधिकारी डॉ. बिपीन   नायगाव(प्रतिनिधी) कानोले,एस,जि जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून आरोग्य कर्मचारी व प्रशासनास सहकार्य करावे ; आतापर्यंत 444 नमुने निगेटीव्ह ; 50 नागरिकांचा तपासणी अहवाल बाकी नांदेड कोरोना रुग्णाची प्रकृती ठीक आहे त्यांच्या वर उपचार चालू आहेत. होत असलेल्या अफ़वावर विश्वास ठेऊ नये अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली व जनतेला आव्हान केले. नांदेड दि.२२ एप्रिल: शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच, या रुग्णाचा मृत्यू झाला अशी अफवा दुपारी दोन वाजल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे. कोरोना रुग्ण जीवंत आहे त्यांच्या वर उपचार चालू आहे. होत असलेल्या अफ़वावर विश्वास ठेऊ नये असे माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली व जनतेला आव्हान केले.  हा रुग्ण सोमवार 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी शासकीय महाविद्यालय नांदेड येथे ताप खोकला व दम लागणेच्या तक्र...

रात्री २:२० वाजता लागलेल्या आगीवर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण. 

Image
रात्री २:२० वाजता लागलेल्या आगीवर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण.   लातूर प्रतिनिधी- लातूरकरांनी आग लागण्याच्या घटना घडू नयेत याकरिता लॉक डाऊन काळापासून बंद असलेली दुकाने, व्यापारी संकुले यांचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवावा. मागील दोन दिवसातील दुसरी घटना. आज दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 2:25 वाजता उद्योग भवन परिसरातील संकल्प बुक डेपो ( डॉ नरेंद्र पाटील यांची इमारत), एम बी एफ बायो फर्टीलायजर कार्यालय खालील दुकानास शॉर्ट सर्किट मुळे लागलेली आग मनपा अग्निशमन विभागा च्या जवानांनी सुमारे 2:30 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आणली. लॉक डाऊन काळापासून बंद असलेली दुकाने, व्यापारी संकुलाचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना असून सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु तरीही प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.

महाराष्ट्रात रुग्णाच्या संख्येत होत आहेत झपाट्याने वाढ -एकूण रुग्ण 5218

Image
महाराष्ट्रात रुग्णाच्या संख्येत होत आहेत झपाट्याने वाढ -एकूण रुग्ण 5218  प्रतिनिधी सुपर फास्ट न्यूज गेल्या 24 तासात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७,८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२,  पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २  तर सांगली येथील १ आणि  पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे . गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग...

पालकमंत्रानी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद .

Image
पालकमंत्रानी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद .  लातूर प्रतिनिधी-आजवर आपल्या सर्वांच्या परिश्रमातून लातूर जिल्हा कोविड १९ मुक्त राहिला आहे. यापुढेही तो सुखरूप ठेवायचा आहे, असे सांगून पदाधिकारी यांनी तुम्ही आपले गाव राखा मी चोवीस तास आपल्या मदतीसाठी सज्य आहे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाऊन– २ संदर्भाने माहिती दिली त्यांच्याकडून गावपातळी पर्यंतची माहिती घेतली, समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. गावपातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी अगदी सहजतेने संपर्क साधताना अदयाप लढा संपलेला नाही,तरी सतर्क राहणास सांगितले. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.

नांदेडमध्ये कोविड १९ विषाणू तपासणी व निदान प्रयोगशाळा मंजूर ; *खा. प्रतापराव पाटील चिखलीकर* 

Image
नांदेडमध्ये कोविड १९ विषाणू तपासणी व निदान प्रयोगशाळा मंजूर ; *खा. प्रतापराव पाटील चिखलीकर*  यांच्यापाठपुराव्याला यश नायगाव(प्रतिनधी) कानोले ,एस,जि नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विंष्णुपुरी नांदेड येथे covid-19 च्या तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे कोरोनाच्या संशयित रूग्णांचे 'स्वब' नमुने तपासणी साठी पुणे औरंगाबाद येथे जावे लागत होते पंरतु आपल्या विद्यापीठात हे सेंटर मंजूर झाल्यामुळे तात्काळ निदान होणार आहे जिल्ह्याचे *खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ.रमेश पोखरियाल* यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे ही प्रयोगशाळा जिल्ह्याला मिळाली आहे ती तात्काळ सुरू होणार आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे कोविड १९ च्या विषाणूंची टेस्ट करण्यासाठी लॅब तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता नांदेडसह राज्यात सहा ठिकाणी अशा लॅब उभारणीसाठी चा प्रस...

लातुर मध्ये आडमार्गाने येणाऱ्या गुन्हे दाखल करणार. 

Image
लातुर मध्ये आडमार्गाने येणाऱ्या गुन्हे दाखल करणार.   लातूर प्रतिनिधी- लातूर र्जिल्हावासियांनी दाखवलेल्या संयमामुळं, नियम पाळल्यामुळं आणि प्रशासनानं योग्य रितीनं कामं केल्यामुळं लातूर ग्रीनझोनमध्ये आहे. अशा परिस्थितीत मुंबई-पुणे इथून काही लोकं लातूर जिल्ह्यात आडमार्गाने येत आहेत. अशा लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.

नांदेडमध्ये कोविड १९ विषाणू तपासणी व निदान प्रयोगशाळा मंजूर ; 

Image
नांदेडमध्ये कोविड १९ विषाणू तपासणी व निदान प्रयोगशाळा मंजूर ;   *खा. प्रतापराव पाटील चिखलीकर* यांच्यापाठपुराव्याला यश नायगाव(प्रतिनधी) कानोले ,एस,जि नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विंष्णुपुरी नांदेड येथे covid-19 च्या तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे त्यामुळे कोरोनाच्या संशयित रूग्णांचे 'स्वब' नमुने तपासणी साठी पुणे औरंगाबाद येथे जावे लागत होते पंरतु आपल्या विद्यापीठात हे सेंटर मंजूर झाल्यामुळे तात्काळ निदान होणार आहे जिल्ह्याचे *खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय मानव संसाधन मंत्री डॉ.रमेश पोखरियाल* यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे ही प्रयोगशाळा जिल्ह्याला मिळाली आहे ती तात्काळ सुरू होणार आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे कोविड १९ च्या विषाणूंची टेस्ट करण्यासाठी लॅब तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता नांदेडसह राज्यात सहा ठिकाणी अशा लॅब उभारणीसाठी चा प्रस...

*मा. मंत्री डॉ. सतिष पाटीलांच्या नदीजोड प्रकल्यामुळे 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

Image
*मा. मंत्री डॉ. सतिष पाटीलांच्या नदीजोड प्रकल्यामुळे 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला*  प्रतिनिधी जळगाव - गिरणा धारणेतून डाव्या जामदा कालव्याने सार्वे, बाहुटे पाटचारीने पिण्यासाठी पाणी सोडल्याने 15 गावांचा पिण्याच्या पाण्यासह गुरेढोरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात नदीजोड प्रकल्प जळगांव जिल्ह्यात यशस्वी करीत अनेक योजना अंमलात आल्याने त्याचे फलित किंवा फळ आज जनतेला मिळत आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील गावांची पाणी टंचाई पाहता. 2009 साली पाठपुरावा करून गिरणेतुन पाटाचारी तयार करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून या पातचरित पाणी सोडण्यात येते. ही पाटचारी अनेक अडथळे दूर करून तयार करण्यात आली होती. आज या पाटचारित गिरणेतुन आवर्तन सोडल्याने बाहुटे, बाभळेगाव, सार्वे, सांगावी, पळासखेडे, इटवे ई. तसेंच धरणगाव तालुक्यातील भवरखेडे, विवरे, बोरगावसह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पूर्वी या गावांना नेहमी पाणी टंचाई भासत असे, परंतु आज पिण्याच्या पाण्याबरोबर गुरेढोरे यांच...

आज.दि.22/04/2020 रोजी वृषभ बंडुजी दरोडे,यांची सुपर फास्ट न्युज रालेगांव तालुका प्रतिनीधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे

Image
*🙏आज.दि.22/04/2020 रोजी वृषभ बंडुजी दरोडे,यांची सुपर फास्ट न्युज रालेगांव तालुका प्रतिनीधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे .सुपर फास्ट न्युज संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये शहरापासुन खेड्या पर्यंत बातमी घरा घरात पोहचवत आहे.सुपर फास्ट च्या संपादक सौ.सविता ताई सपकाळ यांच्या वतिने वृषभ दरोडे यांची सुपर फास्ट न्युज चॅनल रालेगांव तालुका जि.यवतमाळ प्रतिनीधी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ.अमोल जाधव,निखील वाघ (प्रतिनिधी),राहुल दुरतकर (प्रतिनीधी) दादु चाफले (प्रतिनीधी),सचिन महाजन,निकेश वाल्दे किशोर वाघ,अमोल राऊत,मंगेश सोनटक्के,अखिलेश निखाडे,समस्त मित्र परिवारा कडुन सुपर फास्ट न्युज प्रतिनिधी निवड झाल्या बद्दल यांच्या कडुन शुभेच्या देण्यात आल्या.*🙏

*पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला 83 लक्ष रुपये प्राप्त.* संजय गांधी, श्रवणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळच्या लाभार्थ्यांना मिळणार ला

Image
*पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने जिल्ह्याला 83 लक्ष रुपये प्राप्त.* संजय गांधी, श्रवणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळच्या लाभार्थ्यांना मिळणार ला भ. प्रतिनिधी शिवप्रसाद रामप्रसाद येळकर यवतमाळ, दि. 22 : अनेक निराधार लोकांचा उदरनिर्वाह व्हावा, या उद्देशाने त्यांच्या खात्यात शासनाच्यावतीने थेट रक्कम जमा केली जाते. कोरोनामुळे सगळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर या निराधार लोकांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्याला 83 लक्ष 45 हजार 284 रुपये प्राप्त झाले आहे. ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा झाली असून वरील योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करण्यात येणार आहे. लॉकडाऊन तसेच संचारबंदीची झळ सर्वांनाच पोहचत आहे. रोजगार नसल्यामुळे दैनंदिन कुटुंबाचा गाडा हाकणे कठीण होत आहे. त्यामुळे निराधार तसेच वृध्दापकाळ असणा-या लोकांना मिळणारे अर्थसहाय्य त्वरीत उपलब्ध व्हावे, या ...

नाशिक चा रुग्ण कोरोनो मुक्त- 

Image
नाशिक चा रुग्ण कोरोनो मुक्त-  नाशिक जिल्हा शल्यचिकिच्छक डॉ.सुरेश जगदाळे नाशिक मधील गोविंद नगर येथे राहणारा हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महानगर क्षेत्रातील पहिला व नाशिक जिल्ह्यातील २रा रुग्ण ठरला. डॉ .जगदाळे यांनी सांगितले वरून गोविंदनगर येथील हा रुग्ण दिल्ली हुन आलेला होता.४ एप्रिल ला आलेला हा रुग्ण ६ ला ऍडमिट झाला.रुग्णालयात त्याचेवर डॉ,परिचारका,वॉर्डबॉय,या चंबूने त्याचेवर यशस्वी उपचारादरम्यान काल त्याच्या घश्यातील श्राव तपासणीत निगेटिव्ह आला. रुग्णाला विचारले असता तो म्हणाला मी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खूप घाबरलो होतो आता मी मरणार याची मला जाणीव झाली होती परंतु येथील डॉ,नर्स,पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ ने मला जगायची उमेद आली .डॉ.नी माझेवर यशस्वीपणे उपचार केले अन मी कोरोनो मुक्त झालो.हे सांगताना त्याच्या डोळ्यांनी अश्रूंचा बांध मोकळा करून दिला होता. महाराष्ट्र फास्ट न्यूज इगतपुरी निवृत्ती मेदडे निवृत्ती मेदडे

*सत्ता असलेल्या राज्यात जास्त निधीचे वाटप,केंद्र सरकारचा दुपट्टीपणा..*

Image
*सत्ता असलेल्या राज्यात जास्त निधीचे वाटप,केंद्र सरकारचा दुपट्टीपणा..*  *सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज* प्रतिनिधी उल्हासनगर संदेश कांबळे राज्यात नाही तर देशात कोरोना संसर्ग आजाराने हाहाकार माजवला आहे. आज इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण काही अंशतः जास्त प्रमाणात आहे. मात्र याला राज्याची भौगोलिक परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. आता केंद्र सरकारच्या आदेशानुसार १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अर्थ मंत्रालयाने राज्यांचा हिस्सा निश्चित करून एकूण ४६०३८ कोटींची रक्कम जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशला सर्वाधिक ८२५५ कोटी रुपये मिळाले आहेत, तर सिक्कीमला सर्वात कमी १७८ कोटी रुपये मिळाले आहेत. पश्चिम बंगालला ३४६१ कोटी आणि पंजाबला ८२३ कोटी मिळाले आहेत. बिहारला ४६३१, महाराष्ट्राला २८२४, राजस्थानला २७५२ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र आज उत्तरप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तरीही आज महाराष्ट्राला डावलण्याचा प्रकार केंद्राने केला आहे.

जिल्हा सीमाबंदी फक्त कागदावरच

Image
जिल्हा सीमाबंदी फक्त कागदावरच  लातूर-कोरोनाच्या। संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा बंदीच्या फक्त घोषणाच होत असून प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शुन्य असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद करा अशा सक्त सुचना पालकमंत्री आणि जिल्हाअधिकारी वारंवार देत असले तरी याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण सोमवारी पुणे,मुंबई, हैद्राबाद येथून आलेल्या उदगीर शहरातील 20 ते 25 नागरिकांनी रूग्णालयात येवून स्वतःची चाचणी केली. त्या नंतर हाळी येथे अंत्यविधीसाठी पुणे आणि मुंबई हुन 10 ते 15 नातेवाईक उपस्थित होते. तसेच मंगळवारी लातूरमध्ये एका कारला अपघात झाला,ही कार उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेली होती. यावरून जिल्ह्याच्या सीमेवरील नियंत्रण कुचकामी आहे हे सिद्ध होते. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी.

लातूर राज्यातील पहिली बाजार 

Image
लातूर राज्यातील पहिली बाजार समिती.  लातूर- जिल्हाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या निर्देशानुसार लातूर बाजार समिती सुरक्षित सामाजिक अंतर व प्रशासनाच्या सर्व नियमाचे पालन करून सौद्यास प्रारंभ झाला.लॉकडाऊन काळात सुरु होणारी लातूर बाजार समिती ही राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी।

*आमदार अनिल पाटील यांची *तमाम अमळनेरकर (शहर व ग्रामीण) नागरिकांना विनंती* 

Image
*आमदार अनिल पाटील यांची *तमाम अमळनेरकर (शहर व ग्रामीण) नागरिकांना विनंती*   * *प्रतिनिधी जळगाव* - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदार संघांचे आमदार अनिल पाटील यांनी जनतेला आव्हान केले कि कोणतीही बदललेली शारीरिक लक्षणे व तक्रारी लपवुन ठेवू नका, सगळ्यांनी मास्क वापरा, कोणत्याही (अत्यंत तातडीच्या कामा व्यतिरिक्त) कारणासाठी घराबाहेर पडू नका 🙏🏻 जर घराबाहेर पडणे गरजेचेच असेल तर बाहेरील कोणत्याही चिजवस्तुशी ( टेबल/काउंटर, लोटगाडी, गाडी ई.) सरळ संपर्क टाळा. संपर्क झालाच तर तातडीने सेनिटायझर वापरून हात निर्जंतुक करा, घरी आल्याबरोबर भरपुर साबणाने हात पाय स्वच्छ धुवा, शारीरिक स्वच्छता पाळा, सोबत आणलेली वस्तू सुध्दा सेनिटाईझ करा. अफवांना बळी पडू नका, शासन स्तरावर आपली काळजी अतिशय उत्कृष्ट रित्या व तत्परतेने घेतली जाते आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.🙏🏻असे जाहीर आव्हान त्यांनी जनतेला केलेले आहे. *माझे घरच माझे संरक्षक कवच* प्रा. सुनिल पाटील, प्रतिनिधी जळगाव जिल्हा.

*जळगावात जिल्ह्यात अमळनेर येथे आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले*

Image
*जळगावात जिल्ह्यात अमळनेर येथे आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले*  *प्रतिनिधी जळगांव* येथील कोविड रुग्णालयात काल घेण्यात आलेल्या कोरोणा संशयित रुग्णांपैकी दोन रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल *पॉझिटिव्ह* आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन एस चव्हाण यांनी दिली आहे या कोरोना बाधित रुग्णांपैकी एका ५२ वर्षीय महिलेचा कालच रुग्णालयात मृत्यू झाला होता. तर दुसरा रुग्ण हा त्या महिलेचा पती असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.ते दोघेही अमळनेर येथील साळी वाडा परिसरातील होते. या घटनेमुळे प्रांतअधिकारी यांनी त्या परिसरातील 1 कि. मी. चा एरिया बंद केलेला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आता अधिक जबाबदारीने लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. व घरातच रहावे कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे. जिल्हावासियांनी स्वतः ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये. मीच माझा रक्षक ही भूमिका अंगी बाळगून घरातच रहावे. असे आवाहन पा...

पिंपरीचिंचवड शहरातील आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह

Image
पिंपरीचिंचवड शहरातील आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह  ....! पिंपरीचिंचवड:– पिंपरी चिंचवड शहरातील आणखी एका ५५ वार्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह ( २१ एप्रिल )आले आहेत. त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे तर आजपर्यंत ६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील या महिलेचे नमुने तपसाणीसाठी एन आय व्ही कडे पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आले असून या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, पुण्यातील एका भागातील राहणा-या आणि पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे सकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आता या महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आज दोघांना कोरोनाची लागण झाली आहे .

मास्क न घालणा-यांकडून महापालिकेनं केला 13 हजार 100 रूपयांचा दंड वसूल

Image
मास्क न घालणा-यांकडून महापालिकेनं केला 13 हजार 100 रूपयांचा दंड वसूल . लातुर :- लातुर शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने काही  बाबतीत लातुर कोरोना मुक्त असल्याने जीवनावश्यक वस्तू, शेती युक्त व्यापारी दुकाने, आडत बाजार, मेकॅनिकल दुकाने चालू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लातूर चालू झाले असे अनेक समज-गैरसमज करुन काहीजण बिनधास्त  रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. म्हणून लातुर महानगर पालिका आयुक्त व सह आयुक्त फड यांच्या आदेशावरुन क्षेत्रीय आधिकारी  संजय कुलकर्णी यांच्या पथकाने रस्त्यावर फिरणा-या पण मास्क किंवा रुमाल तोंडाला न बांधणा-या लोकांविरोधात दंडाची कारवाई  करुन  13 हजार 100 रुपयांचा दंड वसुल केला आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख, एस आर मोरे, पंडित गोरोबा, पवार, सुरेश कांबळे, संतोष फिस्के, वैराग्य उपस्थित होते . त्यानी दंडाची कारवाई सुरू केल्यानंतर आता रस्त्यांवर नागरिक मास्क लावून फिरत आहेत. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी.

सिसीआय मार्फत सर्व कापुस खरदी करणे बाबत. निवेदन 

Image
निवेदन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई- ३२ विषय:- सिसीआय मार्फत सर्व कापुस खरदी करणे बाबत. निवेदन करणार:- अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना. महाशय, सविनय निवेदन सदर करतो की, कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासनाने, सिसिआय मार्फत होणारी कापुस खरेदी बंद केली होती. दि. १९ एप्रील पासुन शेतकर्‍यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असुन पुढील २- ३ दिवसात खरेदी सुरु होणार असल्याचे, दि. १८/४/२०२० च्या परिपत्रकात म्हटले आहे. परिपत्रकातील अटींनुसार शेतकर्‍यांकडील सर्व कापुस खरदी होणे अशक्य आहे. शासनाने निश्चित केलेल्या एफएक्यू दर्जाचा फार तर २०% कापुस शेतकर्‍यांकडे शिलल्क आहे. ८०% कापुस हा नंतरच्या वेच्याचा (फरदड) कापुस आहे. शासनाने हा कापुस खरेदी नाही केला तर शेतकर्र्‍यांना आतिशय कमी दरात व्यापार्‍यांना द्यावा लागणार आहे. सबब शासनाने फक्त एफएक्यू दर्जाचा कापुस खरेदी न करता, आणखी दोन किंवा तिन ग्रेड करुन कापुस खरेदी करावी. जिन मालकही कापुस खरेदी करण्यास उत्सुक नाहीत. जिनिंग मिल वर मजुरांच्या उपस्थितीवर मर्यादा असल्यामुळे पुर्...

दोन हजार परिवाराला मोफत धान्य वाटप

Image
दोन हजार परिवाराला मोफत धान्य वाटप . लातूर-सबंध भारतात, महाराष्ट्रात कोरोना रोग पसरलेला असून त्यामुळे मजूरीवर आधारित असलेल्या सर्वसामान्य जनतेला कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक हातावर पोट असणार्‍या गरीब लोकांची हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे भान ठेवून, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सक्षम व दानशूर संस्था व्यक्‍तीने पुढे यावे, असे आवाहन केले होते, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कव्हेकर परिवाराच्या वतीने प्रभाग 18 मधील गरजू व मजूर, कष्टकर्‍यांच्या दोन हजार परिवाराला मोफत धान्य वाटप करण्यात आले तसेच अत्यंत गरजू परिवारापर्यंत हे किट पोहचणार आहे. व गरज नसल्यास, ज्या केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांनी किराणा दुकानामार्फत धान्य घेतले आहे, अशा परिवारांनी हे किट न स्विकारता ज्यांची हालाखीची परिस्थिती आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य किट पोहचवण्यामध्ये मदत करावी,असे नम्र आवहान नगरसेवक अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे. या धान्य किट वाटपाचा शुभारंभ नुकताच प्रभागात करण्यात आलेला असून या प्रभागातील मजगे नगर,पिनाटे नगर,...

*लॉकडाउनच्या काळात अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री*

*लॉकडाउनच्या काळात अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री*  *प्रतिनिधी जळगाव* मागील गेल्या 1 महिन्यापासून लॉकडाउन मुळे सर्वच व्यवहार व दुकानें बंद आहेत. त्यात सर्वात मोठी हानी दारू पिणाऱ्यांची झाली आहे. अशातच अमळनेर तालुका व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बनावट व विषारी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे दारू पिणारे व्यसनाधीन मंडळी अशाप्रकारची दारू महागात विकत घेऊन आपला शोक पूर्ण करताय. प्रशासन कोरोना ग्रस्थ भागात अडकल्यामुळे बनावट दारू विक्रेते भन्नाट दारू विकत आहेत, भविष्यात याचा भयंकर परिणाम या व्यसनी मंडळींच्या आरोग्यावर होईल. तरी या बनावट दारूला प्रशासनाने जिल्ह्यातून हद्दपार करावी असा आवाज सर्व सामान्य जनतेतून येत आहे. प्रा. सुनिल पाटील प्रतिनिधी जळगाव जिल्हा

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन ठरले लाखमोलाचे

Image
आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन ठरले लाखमोलाचे ....!  सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ता.२१ नवी सांगवी : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉक डाऊन आणखी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ प्रतिष्ठान नवी सांगवी यांच्या वतीने अध्यक्ष ललित म्हेसेकर आणि प्रतिष्ठान च्या महिला दीपाली कुलकर्णी,ऐश्वर्या कल्याणी , भावना पाटील अमृता कुलकर्णी,प्रणाली मूलटकर,गायत्री कल्याणी यांनी घरगुती बनविलेले ७५०मास्क आपल्याच परिसरातील गरजू आणि गरीब नागरिकांना मोफत वाटण्यात आले,हे मास्क महिलांनी स्वतः बनविले असून या फावल्या वेळात कोणताही मोबदला न घेता त्यांनी ही सेवा केली असल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आपल्या भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटातून सर्वांनी लवकरात लवकर बाहेर पडावे यासाठी सर्वांनी घरातच राहवून सोसिअल डिस्टन्स पाळावे असे आवाहनही ललित म्हसेेंकर यांनी यावेळी सर्वांना केले,आमदार लक्ष्मण जगताप यांचे नेहमीच कौतुकाची थाप आणि मो...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com