Posts

Showing posts from June, 2022
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सत्तेचे वारकरी--- दर्जेदार लेख नक्की वाचा !!!

Image
सत्तेचे वारकरी    सत्तेच्या पालखीचा वृत्तान्त- दि.१९ जून सर्व वारकरी ठाणे येथील महापौर बंगल्यामध्ये जमा झाले. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला‌.'धर्मवीर' महाराजांनी या सोहळ्याचे नियम समजून सांगितले. मधून कुणालाही परत येता येणार नाही, हेही सांगितले. तेथून उत्साहात सोहळा सुरू झाला. पालखीचा पहिलाच मुक्काम सुरत येथे झाला. स्वागतासाठी कंबोज आणि कुटे यांनी कंबर कसली. सर्व वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची आणि मनोरंजनाची व्यवस्था केली होती.     सुरत येथे पहिले रिंगण सुरू असतानाच, उस्मानाबाद येथील एक वारकरी घराच्या आठवणीने व्याकुळ झाला. लघुशंकेचे निमित्त करून तेथून सटकला. मिळेल त्या वाहनाने घरी परतला. हे समजताच वारकऱ्यांमध्ये ठराव झाला. आता कुणालाच परतू द्यायचे नाही.     एवढ्यात अकोला येथील दुसरा वारकरी मी घरी जाणारच म्हणून हट्ट करू लागला. त्याला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन झोपेचे इंजेक्शन देऊन झोपवला. घरून फोन आल्यावर हार्ट अटॅक आल्याचा निरोप दिला.      दुसऱ्या दिवशी आसाम येथील गुवाहाटी येथे जाण्यास पालखी सोहळा निघाला. सकाळी सकाळी सुरुवातीलाच 'धर्मवीर' म...

एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन..

Image
एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन सध्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट कोणत्याही पक्षात विलीन केलेला नाही. अजूनही आम्ही कोणत्या पक्षात सामील झालेलो नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार, असे बंडखोर आमदारांकडून सांगितले जात आहे. असे असताना शिंदे यांनी राज ठाकरे यांना एकूण दोन वेळा भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला आहे. या फोन कॉलमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आज अमेय खोपकर नेमकी काय माहिती देणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राजीनामा देण्यापासून शरद पवार यांनी रोखले !!!!!

Image
राजीनामा देण्यापासून शरद पवार यांनी रोखले !!!!! मुंबई : वृत्तसंस्था : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 आणि 22 जूनला राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र त्यांना राजीनामा देण्यापासून शरद पवार यांनी रोखले असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे बंडखोरी करत थेट सुरतला पोहचले होते. त्यानंतर शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला. सुरत वारीनंतर गुवाहाटी येथे राजकीयनाट्याला सुरूवात झाली. या कालावधीमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा जोर धरु लागली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधीत करत आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मी आजच माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवत आहे, असे भावनिक आवाहन केले होते. ठाकरे यांच्या ऑनलाईन संवादानंतर शरद पवार, खा. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात एक तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत होते, पवार यांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले. ...

संजय राऊत यांना ईडीची समन्स !!

Image
संजय राऊत यांना ईडीची समन्स !! मुंबई :  एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यांना मंगळवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, डीएचएफएलशी संबंधित एका प्रकरणात त्यांची चौकशी केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. म्हाडाच्या तक्रारीवरून २०१८ मध्ये एचडीआयएलशी संबंधित गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे तत्कालीन संचालक राकेश वाधवान, सारंग वाधवान व इतर आरोपींविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने २००६ मध्ये पत्रा चाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. विकासकाने ६७२ रहिवाशांना वाऱ्यावर सोडले. तसेच म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे २०११ मध्ये उघड होताच म्हाडाने त्यावर कारवाई सुरू केली. म्हाडाच्या तक्रारीनंतर याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ...

भाजप-शिंदे फॉर्म्युला ठरला! इकडे मंत्री ते तिकडेही मंत्री होणार; आणखी काही मंत्रिपदेही देणार

Image
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. प्रतिनिधी Dr अमोल जाधव मुंबई : राज्यात भाजप - एकनाथ शिंदे गट असे सरकार स्थापन झाल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या मंत्री असलेल्या व शिंदे गटात सामील झालेल्या सगळ्यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत. हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील. या शिवाय शिंदे गटातील गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, उदय सामंत हे पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील. संजय राठोड हे उद्धव ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. तथापि, पूजा चव्हाण प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी बंजारा समाजाच्या महंतांनी अलीकडेच ठाकरे यांना भेटून केली होती. आता फडणवीस-शिंदे सरकार आल्यास त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिल्याचा दावा महंतांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.  शिंदे यांच्यासोबत...
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com