श्रीरामपुर शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम चालू आसून अमरण उपोषण करून सुध्दा शासनाचे दुर्लक्ष
*श्रीरामपुर शहरात रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम चालू असून*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

नगर अध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केली उपोषण कर्ते यांची फसवणूक *छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने दिनांक ११/११/२०१९ ते दिनांक १५/११/२०१९ पर्यत श्रीरामपुर शहरातील रस्त्याच्या संदर्भात अमरण उपोषण करण्यात आले असता नगर अध्यक्षा अनुराधा आदिक यांनी रस्त्याचे काम आपल्या आंदोलनाच्या अनुषंगाने चालू केले असून चांगले काम करण्यासाठी आपण लक्ष घाला सांगितले असता दिनांक १७/११/२०१९ रोजीच काम निकृष्ट होत असल्या बाबत नगर अध्यक्ष यांना सांगितले असता ते म्हणाल्या आपण त्यांना सुचना देऊ सांगितले असता कोणत्याही प्रकारे आज पर्यत त्यांनी ठेकेदार यांना समज दिला नाही खडी मुरूम मिस्रीत वापरल्या जात असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून ह्या मुजोर लोकांना संभाळायचे काम नगर अध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे श्रीरामपुर शहरातील नागरिकांच्या जिवासंग खेळण्याचे काम यांच्याकडून होत आहे हे म्हणावे लागेल. तसेच कामाच्या जागेवर आम्ही तक्रार केली असता ठेकेदार जगताप याचा भाडखाऊ कर्मचारी देशपांडे यानी विधान केले जगताप हे विखे यांचे नातेवाईक आहे यांचे काही होणार नाही नगर मनमाड हायवेच टोल नाका खासदार लोखंंडे यांनी बंद केलेला विखेंनी चालु केला असे विधान हे लोक करीत असेल तर नेमके या जिल्ह्याचे वाटोळे करणारे सगळेच ठेकेदार विखेंचे पाहुणे आहे का असा प्रश्न पडत आहे.