'अमोल यादव नावाच्या मराठी मुलाने एक विमान बनवले. मग मुख्यमंत्र्यांनी मेक इन इंडियाच्या अंतर्गत जमीन देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचे पुढे काही झाले नाही. या मुलाला अमेरिकेतून बोलावणे आहे. आपल्या मराठी मुलामध्ये काय क्षमता आहे हे त्यांना कळलं, त्यांनी त्याला बोलावून घेतलं. आज तो तिकडे काम करतोय,' असं राज यांनी अमोल यांचे उदाहरण देत सांगितले. 'सध्या तरुणाईला भारतात रहायचेच नाहीय. येथील परिस्थिती, शहरे त्यांना नकोशी झाली आहेत. या मागे नियोजनाचा अभाव आहे,' अशी टीका राज यांनी केली. यावेळी त्यांनी '१८-१८ वर्षांची पोरं परदेशात जाण्याचा विचार करत आहे का तर इथे आपलं काहीच होणार नाही हे त्यांना ठाऊक आहे,' अशी टीका केली.